नोंद
वेळ होता म्हणून थांबलो जरा तर थांबलास म्हणत वेळ निघून गेली जर तर ची दुनियादारी नव्हतीच मुळी मन दुभंगलंय … सारंच हवंस झालंय आहे … तरी सुटून जातंय काही तुला आनंद माझ्यापेक्षा जास्त तुझ्याकडे असण्याचा पण माझ्या नावातला आनंद अजुन … तुला कमवता आला नाही स्वप्न रोज पुरून पुन्हा ऊकरून काढ रात्र चांदण्या पसरवल्यात त्यावर … समाधी म्हणून आपण आपलंच आठवत राहतो आपल्यासाठी आणि नसतो स्वार्थी … हे आजही पटत नाही जाऊया कधी … तू सांग जसं जमेल सोबत आलास तर प्रेम नाही …, तर अपघाती म्रुत्युच्याही होतात नोंदी .