गावजेवण
इथे माकडाचा खेळ पाहून खुश होऊन टाळ्या वाजवणारे नसले तरी बघणाऱ्यांची गर्दी येत नाही लपवता आणि जीवनाचा प्रश्न इथे उगवतो तेव्हा आपल्याच घरातून नीलाम होऊन उघड्या आकाशाखाली आपली रचली जाते चिता. उरलेली राख फक्त नदीस श्रध्दांजली वाहतात 'आत्म्यास शांती' चा मजकूर देऊन की माझ्या मृत्यूचा आनंद म्हणून गावजेवण देतात ?