Posts

Showing posts from March, 2017

पूर्णविराम

नाही थांबत मन मरेल एक वेळ इथे पूर्णविराम हवाय. तुझे विचार कुठवर पोहोचलेत तपासत राहा स्थितप्रद्न्य राहण्यापेक्षा किमान बदललेलं बरं नंतर नंतर तर कुणी विचारत देखील नाही मग शब्दांचे फेर कितीही धर वृद्ध मनसुद्धा विचार करते... त्या आधीचं बाकी सारं आलंच आहे... नि जन्मत राहिल काना कोपऱ्यातील कोळी जाळं विणून वाट बघतोय "हा सुद्धा त्यात सापडला तर..." अर्थात तुला खाणार नसला तरी विचार करतच असेल ना तो? पाटी कोरी राहते कधी कधी नि मग त्यावर उमटलेल्या कधी काळच्या रेघा अलगद दिसू लागतात चूकसुद्धा विचार करून कृतीत उतरवता येते कशाला कुणाचं भलं करावं? हा मग सुविचार होतो.

अहंकार

उतरून वाटेवरून पसरत गेलेलं जग पायाखालची जमीन तिथेच ठेवून माझं कोण कुठे आहे? शोधत फिरतो अनवाणी अनोळखी वाटा सांभाळून घेतात तू दूर का? मोहाचा आवाका मिटत नाही... पहिल्या पावसाची वाट सांग, मी भिजू नको? पूर्वेचं पश्चिमेला सूर्य सांगतो सगळं दृष्टी कवीची नसते त्याला! आपल्याला भेटायचंय हे ठरवावं लागेल लवकर मनातलं, कुशीवर झोपून सत्याचा प्रयोग स्वप्नात हसणं मर्त्य एक रात्रीचं स्मशान कार्य वाटेवरचं एकट्याने बसणं दु:सह्य होतं. तुझ्या बोलावण्याचा आवाज येईल बघ, तुझ्या घराबाहेरच बसलोय पावसाची आठवण परत सतत येते मातीचं काय काय असते नि तो, काय काय घडवून जातो. शब्दांना अहंकार जिभेनं सांगितला नसता तर...! उम्मिदिला काही अर्थ असता ना!!!