कधी शहारतात कधी बहरतात अंगावरच्या आनंद खुणा रुंजी घालतात सतत मनात न विसरणाऱ्या पाऊल खुणा ओठांवरही अवखळ रुळतात तुझ्या माझ्या शब्द खुणा आतुर नजरांना आठवतात आपल्यामधल्या खाणा खुणा क्षितिजावर रोज मावळतात हलक्या नाजूक स्पर्श खुणा सर्व दिशांना उगवतात मन जाळणाऱ्या सूर्य खुणा काही माणसं जवळतात सावल्यांत घेऊन शापित खुणा का आधार देऊन दुरावतात हृदयात ज्यांच्या काळीज खुणा...?
सुरुंग वाटेत पेरून रोज घरी परततो संकटाची पावलेही जड असतात…, ऐकल्यापासून घर कधीतरी छावणी, कधी शत्रूही सोबत राहतात. सुखा दुःखाची चढाई एकमेकावर केव्हाही शांतीचा आग्रह धरत, माझाच बळी देत मी दोघांचंही अस्तित्व नाकारतो…, कारणमीमांसा करतो तर हजारो वर्षांपूर्वीचं कुणाचं हास्य कानी पडतं…! माझंच सारं जीणं नादुरुस्त असेलसं समजून घराबाहेर पडलं तर 'संध्याकाळी लवकर घरी याल' म्हणत, माझ्या सावलीत आणि एक स्त्री देह वावरतो परिस्थितीची सदैव जाण करून देत ती मोकळं करते मला… तिचाही संसार ती माझ्यातच पाहते! चेहेऱ्याच्या सर्व स्नायुंना आनंद विकाराचा झटका देत माझं खोटं हास्य तिच्या गळी उतरवत, पाय उतार होतो… 'दिलको बेहेलाने के लिये' वगैरे वगैरे आठवत गालिब सारखे दोन - चार जणं प्रवासात सोबत करतात. अवैध संपत्ती जप्त करतात अगदी तसंच या प्रश्नांचही होऊ शकते का? हा क्रांतिकारी विचार लोकसभेत शुन्य प्रश्नोत्तर काळात चर्चिला जाऊ शकतो का? इतकं मन काव्यात्मक होऊन जाते… अर्थात ३६ रुपयांत गरिबी संपवता येऊ शकते हाही आधार असतो त्या विचारला. कुत्र्याने अंग झटकाव तसं स्वप्नही झटकते मला ...
दिलकी गहराईयोंमे कुदके देख जालिम मिट्टीसे जान बनाना मुश्किल है अब भी लोग सामने देखके मुस्कुराते हैं कुछ चेहरे मैं अच्छा हुं बुरा देखकर भी पहचानता हुं कभी तो जमेगी बात सोचकर चलता रहा आधी जिंदगी चला , किस्से आधे भी न चले तुझे पहेली समझके लोग बुझते रहे मैं जवाब तो दे दुं , तु मुकर जायेगी चुपसे याद दिला मुझे उम्र कि , मै अकेला नही बयां करने के लिऐ तजुर्बे कैसे मिलते है खुश है तु किस बातपे , सोचता हैं वो खुश हैं तु इस बातपे , वो जानता ही नही मैं भुल ...
Comments
Post a Comment