कुठं चुकतंय...?

किनारा आणि लाट 
असेलच तळव्यांना स्पर्शुन
तेव्हा सारं काही अथांग असतं

मावळतीला न्याहाळून परतशील
तेव्हा मागे अंधारात समुद्र...
विरह भोगत असेल

तसं नसेल तर
तेच अथांगपण किनार्यावर सोडून
मुक्तपणाचं असणं
मीही सहज विसरतो.

सांग, काय नी कुठं चुकतंय...?

Comments

Popular posts from this blog

गहराई

ज्यांचं कुणीच नसते

रहस्य